Friday, 12 January 2018

भारत वीर नरेन्द्रं त्वं वंदे सिंह निनादम्


एतद्देश प्रसूतस्य सकशादाग्रजन्माना ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन पृथ्वियां सर्व मानवः।।

या भारतीय स्वप्नाचे साकार रूप म्हणजे स्वामी विवेकानंद .एक संन्यासी पण प्रखर राष्ट्रभक्त जो भारतातील सर्व क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान बनला.स्वामी विवेकानंद नेहमी सांगत विचारांचा प्रभाव हा फक्त 25% पडतो, पण असे जीवन जिथे विचार आणि आचार यामध्ये एकवाक्यता आहे तिथे चारित्र्य निर्माण होते आणि भारतीय संस्कृती इथे आग्रही आहे आणि त्याचे धवल चारित्र्याचे मूर्त स्वरुप हे विवेकानंद स्वतः होते. त्याग आणि सेवा या शब्दांचा अर्थ म्हणजे स्वामी विवेकानंदांचे जीवन .

Be and Make या संदेशातून त्यांनी संपूर्ण भारतीय संस्कृतीचे सारच सांगितले आहे .आज विवेकानंद यांची ओळख फ़क्त sisters and brothers of America असे शिकागों धर्मपरिषदेत बोललेले इतकीच् आहे हेच आपले दुर्दैव. पण विवेकानंद म्हणजे फ़क्त त्यांचे विचार नाही तर त्यांचे जीवन हाच त्यांचा विचार .शिकागो धर्मपरिषदेच्या अगोदर थंडीत कुड़कुडत रात्र घालवणारे , कोणाचीच विशेष ओळख नाही , खिशातली दमड़ी देखील संपलेला एक कंगाल भारतीय .त्यांच्या वेशाकडे बघुन अमेरीकी लोक हसत होते पण त्यांना काय माहीत , character म्हणजेच personality .

शिकागो चे त्यांचे व्याख्यान अर्थात त्यांच्या जीवनातला रोमांचकारी प्रसंग जसे शिवाजी महाराजांच्या जीवनात अफज़लखान वधाचा प्रसंग.असे प्रसंग व्यक्तीला समाजात एक अलौकिक  स्थान मिळवून देतात कारण समाजाला नेहमीच अशा नाट्यमय घटनांची आवड असते .पण फ़क्त या घटना म्हणजे त्यांचे जीवन नसते .अर्थात त्या व्याख्यानाने स्वामीजींना प्रसिद्धि मिळवून दिली. अमेरिकी माध्यमाने A  Cyclonic Hindu अशी स्वामीजींची ओळख करून दिली .दोन दिवस अगोदर कंगाल असणारा हा संन्याशी आता अमेरिका आणि भारत असा सगळीकड़े प्रसिद्ध झाला होता .

पण विवेकानंदांचे खरे जीवन दर्शन इथून पुढे सुरु होते .कीर्ति आणि प्रसिद्धीच्या टोकावर एका दिवसात पोहोचलेला परिव्राजक नरेंद्र बळी पडला नाही म्हणूनच ते स्वामी विवेकानंद होऊ शकले .त्या रात्री विवेकानंदांना राहण्याची उत्तम सोय करण्यात आली .विवेकानंदांना आरामदायी , आनंददायीं वाटावे यासाठी आवश्यक ती सोय यजमानाने केली होती .भौतिक सूखे पायाशी लोळण् घालून उभी होती पण त्याच क्षणी स्वामीजींचे हृदय भारतासाठी पिळवटुन निघत होते .आरामशीर गाद्या आणि पलंगावर स्वामी झोपु शकले नाहीत .जमिनीवर पड़ल्यापडल्या ते अगदी लहान मुलागत रडू लागले .भारतातल्या परिस्थितिने अश्रुची धार थांबत नव्हती आणि स्वामीजी प्रार्थना करू लागले ,"हे माते , माझा देश घोर दारिद्रयात रुतला असताना कोण प्रसिद्धीची पर्वा करतो ! आम्ही भारतीय इतके दुःखी , कष्टी व् दरिद्री आहोत की आमच्यापैकी लक्षावधी लोक मुठभर अन्नासाठी मृत्युमुखी पडतात .याउलट येथे लोक व्यक्तिगत सुखासाठी वारेमाप उधळपट्टी करतात .कोण या भारतीयांना आधार देईल ? अन्न देईल ? मला सांग आई , मी त्यांची कशी सेवा करू शकेन ? त्यांच्या कसा उपयोगी पडु शकेन ?"
हे धगधगते प्रेम म्हणजे स्वामी विवेकानंद .

विवेकानंद जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी इथली धूळ मस्तकावर घेतली आणि म्हणाले Now the very dust of India is also holy to me. कदाचित आज परदेशवारी करून आल्यावर प्रथम इथल्या भूमिवर थुंकणारा आणि परदेशाचे गुणगान गाणारा आजचा तथाकथित भारतीय ही राष्ट्रीयता समजू शकणार नाही .Islamic body with Vedantic Brains ही हिंदुंचि सर्वसमावेशकता आजच्या Pseudo Secular लोकांना देखील समजणार नाही .

विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून साजरा केला जातोय त्यासाठी युवावस्था समजून घेतली पाहिजे .

जबसे सुना है मरने का नाम जिंदगी है सर पे कफन बांधे कातिल को ढुंढते है  .ज्यांना मृत्युत हि जीवनाचे दर्शन होते तेच जीवन . जन्म आणि मरण या अटळ गोष्टीत युवावृत्ती जोपासणे म्हणजेच  जगणे . पण आहे काय हे यौवनाचे सुवर्णमौक्तिक रसायन ? कि जे न पचल्यानेच आज आपले राष्ट्रीय जीवन भरकटले आहे . आणि जे पचले तर राष्ट्र हे उन्नतीच्या शिखरावर पोहोचणे हे स्वप्न राहणार नाही तर ते वास्तव बनेल.

If you could influence the young it would  turn earth into heaven - Katharine T.Hinkson

अर्थात हेच गमक स्वामी विवेकानंदानी ओळखल आणि युवकांना प्रेरित केल .
मानवी जीवनाचा वसंतकाळ म्हणजे यौवन. उज्ज्वल प्रभात ची शोभा , शरदचंद्राचे माधुर्य , ग्रीष्माच्या मध्यान्हातला प्रखर ताप , भाद्रपदाच्या अमावास्येच्या अर्धरात्रीची भीषणता म्हणजे यौवनकाळ.

यौवन म्हणजे शस्यश्यामला वसुन्धरेचा आविष्कार पण यातच भूकंपाची भयानकता हि भरलेली आहे .

इथे फक्त फक्त दोनच विकल्प आहेत , उन्नतीच्या अंतिम शिखरावर चढण्याची हिम्मत बाळगणे किंवा अध:पतनाच्या अंधाऱ्या खोल गर्तेत बुडून जाणे . ठरवले तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला संयम ,त्याग याची जोड देऊन शाश्वत विकास करणे  नाही तर त्याच तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुख सोयीत विलासी जीवन जगत कधीच न जगल्यासारखे मरणे. विश्वाचा इतिहास युवकांच्या कर्तृत्वाने भरलेला आहे . सर्व गूण धारण करण्यासाठी विशाल हृदयाची आवश्यकता असेल तर जगाला युवकाकडेच यावे लागेल . वीरा भोग्य वसुंधरा (हि पृथ्वी फक्त वीरांसाठीच आहे ) हे तत्व आचरणात आणण्याची हिम्मत फक्त युवकात आहे . रणचण्डिकेच्या ललाटावरची विजयाची भाग्यरेखा , आत्मत्यागी वीर, साहित्य संगीत कला यातील रसिकता , मानवी संबंधातली हळवी भावुकता ,शास्त्र तंत्रज्ञानातले शुद्ध ज्ञान , ध्येयासाठी पछाडलेपण म्हणजे यौवन .पण या भूतलावरची सर्वात बिकट समस्याच युवक ठरत आहे कारण तो काहीही करू शकतो ( I Can  Do  ) ,अगदी काहीही . हीच त्याची खरी ताकत , काहीही करू शकण्याची . गरज आहे ती विधायक  दृष्टीकोनाची . यौवनात जोश आहेच ती भरण्याची आवश्यकता नाही ,गरज आहे त्यात होश आणण्याची.

हाच तो काळ ज्यामध्ये विधात्याने दिलेल्या सर्व शक्ती समजण्याची आणि विधायक दृष्टीने आचरणात आणण्याची हिम्मत असते.

Youth is the season of hope ,enterprise , energy to a nation as well as a individual -

आज विश्वात आपला भारत देशच युवा नेतृत्व करू शकतो . कारण इथे खूप युवक आहेत त्याहीपेक्षा त्या तरुणाईचा सळसळता उत्साह येथे आहे . आज खूप जण प्रत्येक गोष्टीसाठी युवकांकडे बोट दाखवतात. सगळीकडे अशी तकार आहे कि आजचे युवक कशावर श्रद्धा  ठेवत नाहीत . पण हेच तरुणाईचं गमक आहे , कि तो समजल्याशिवाय काही करत नाही . तो प्रश्न विचारतो हेच त्याचे विवेकीपण आहे .एक पाश्चात्त्य तत्ववेत्त्याने म्हटले आहे कि , It is an established truism that youngmen of today are the countrymen of tomorrow holding in their hands the high destinies of the land. They are the seeds that spring and bear fruit.

हे युवकच देशाचे भाग्य निर्माते आहेत . भविष्यातील सफलतेचे बीज यांच्यात विद्यमान आहे .

विश्वाच्या इतिहासात जिथे जिथे क्रांती दिसेल , परिवर्तन दिसेल तिथे तिथे असेच युवक दिसतील ज्यांना  त्या तत्कालीन व्यवस्थेतील चाकोरीबद्द्ध जीवन कुंठणाऱ्या प्रत्येक बुद्धिमानाने पथभ्रष्ट किंवा माथेफिरू ठरवले होते . झोकून देऊन स्वतःच कर्तव्य बजावणारी , ध्येयाने पछाडलेली युवा पिढी यांनीच विश्वात मांगल्य आणले आहे . कवी कुसुमाग्रज यांनी या वेड्या क्रांतिकारकांचे ध्येय आणि मूक मनोगत एका  कवितेत खूप सुंदर केले आहे ..

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडून भिंत
अन आईला कळवा आमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले हि या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करती प्रणिपात

हे ध्येयवेडे क्रांतिकारी आईला / मातृभूमीला सांत्वन देताना म्हणतात ,

कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे  उष:काल

अशा युवकांच्या रक्ताने लिहिलेला इतिहास जिथे आहे तिथे अजून प्रेरणेची काय आवश्यकता ? स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोहुन रामेश्वरम ला आले तेव्हा त्यांनी केलेले संबोधन हे नक्कीच आजच्या युवा पिढीला आश्वासित करणारे आहे आणि तथाकथित निराशावादी बुद्धिमानांचे डोळे उघडणारे आहे .
‘‘सूदीर्घ रजनी अब समाप्तप्राय सी दिखाई देती है। लम्बी काली रात टल गई अब उषा होने को है। यह सोया भारत जाग उठा है। केवल अन्धे देख नही सकते, विक्षिप्तबुद्धि समझ नहीं सकते कि यह सुप्त विराट जाग गया है। हिमालय से चल रही मंद शीतल लहर ने इस महाकाय को जगा दिया है। अपनी नियती को यह प्राप्त करके रहेगा। विश्व की कोई शक्ति इसे नहीं रोक सकती।’’

हे उदगार आले फक्त युवकांच्या भरवशावर .आणि ज्यांची बुद्धी विक्षिप्त नाही त्यांना हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत असेलच . देशातली युवाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात नवे कीर्तिमान स्थापन करत आहे . ज्ञान-विज्ञान , आर्थिक विकास , अंतराळ विज्ञान ,संगणक , व्यापार , इत्यादी सर्व क्षेत्रात भारतीय युवक आपला गमावलेला गौरव परत मिळवून विश्व् नेतृत्व करण्यास भारताला अग्रेसर करत आहेत . विश्वात सर्वाधिक अभियंता आणि चिकित्सक आज आपल्याकडे आहेत . त्यासोबत  कुशल आणि अकुशल श्रमिक लोक अधिक संख्येने इथेच आहेत . अकुशल वर्गाला जर व्यवस्थित आणि योग्य प्रशिक्षण दिले तर आपण येणाऱ्या अगदी काही वर्षातच अधिक श्रमिक वर्ग असलेला देश असू .  हे खरंच आहे कि तितक्याच समस्यांही आज आपल्या समोर आव्हान बनून उभ्या आहेत .

पण संधी आणि आव्हान  हे दोन्ही एकत्र उभे असताना आज युवकाला कर्तव्यासाठी उभं राहावंच लागेल . तमोगुणाच्या समुद्रात बुडालेल्या तरुणाईला आज बाहेर यावे लागेल . नुसत्या निष्क्रिय प्रार्थना करून काहीच होणार नाही . गेली सहस्रो वर्षे हा देश प्रार्थनांनी दुमदुमत आहे . पण कोणताच देव आमची प्रार्थना ऐकण्यास तयार नाही . का ऐकावे त्याने तरी ? मूर्खांची गाऱ्हाणे माणसंही ऐकत नाहीत तर भगवंतांनी तर का ऐकाव्यात ?

आता फक्त श्रीमदभगवदगीतेतील शब्द आहेत जे सांगतात कि ,
क्लैब्य: मा स्म गम: पार्थ न एतद त्वय्युपपद्यते |

दौर्बल्य टाकून दे , षंढ बनु नकोस.

तस्मात्वमूत्तिष्ठ यशोलभस्व |

उठ आणि यश , कीर्ती संपादन कर .

जागृत , सामर्थ्यशाली , संगठीत  तरुणाइ जेव्हा समर्पित भावनेने कर्तव्य करेल तेव्हा तो सुवर्ण दिवस असेल आणि स्वामी विवेकानंदांचे स्वप्न सत्यात अवतरलेले असेल .

आता आपल्याला मोहमयी निद्रेचा त्याग कराव लागेल . भौतिक सुखसोयी मिळवायच्याच आहेत पण सोबत नैतिकतेची कास धरून . ( Material Proeperity with Deeper Moral Sensitivity ) .
प्रेम तर  करायचच आहे पण कर्तव्यला न विसरता .कर्तव्य हाच ईश्वर आहे आणि अंतिम परिमाण आहे .तिथे प्रेमाला , अगदी जवळच्या व्यक्तीचा त्याग करावा लागेल पण कर्तव्याला मुकता येणार नाही . जर कर्तव्यच्यूत झालो तर दुबळे ठरू .

“Farewell Farewell My true Love
The army is on move;
And if I stayed with you Love,
A coward I shall prove."

आपल्याला दुर्बल करणाऱ्या गोष्टींचा विशाप्रमाणे त्याग करा हां स्वामींचा संदेश हेच यशाच गुपित आहे .

Anything that makes you weak physically, intellectually and spiritually, reject as poison.

पुन्हा एकदा दाखवून देऊ आपल  वेडेपण, कारण हेच तर राष्ट्रनिर्माणच खरं साधन आहे . जग वेडच ठरवेल , तेव्हा सांगू ,

इन्ही बिगडे दिमाग में राष्ट्रनिर्माण के बीज है
हमें पागल हि रहने दो हम पागल हि अच्छे है ।

-- सागर मुत्तगी
संकलित ( स्वामी विवेकानंद चरित्र आणि भगतसिंग यांचे विचार यातून )

14 comments:

  1. अप्रतिम लेख

    Keep it up.

    ReplyDelete
  2. Aprateem .... Very meaningful

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख👌👌👌

    ReplyDelete
  4. उगवनाऱ्या भास्करास सांग
    आम्हास थोड़े तेज दे,
    भोगवादाच्या अंधकारात वाट हरवलेल्या यौवनास,
    जीवनाकडे बघण्यासाठी विवेक दे।
    -चेतन

    वाह सागर!

    ReplyDelete
  5. वा सुंदर लेख

    ReplyDelete
  6. खूप छान लेख सागर भाऊ.....

    ReplyDelete
  7. खुपच प्रेरणादायी आणि पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख 🙏

    ReplyDelete
  8. खरच अतिशय सुंदर लेखन...सागर....तू फार छान लिहतोस...

    ReplyDelete