Saturday, 2 September 2017

नीरक्षीरविवेके तु हंसो हंसः बको बकः



भारताचे झालेले अधःपतन म्हणायचे की...भारतात विचारवंतांचा दुष्काळ पडलाय..?

आज पाश्चिमात्यांमध्ये 'विचारवंता'ची असलेली व्याख्या काय आहे याचा यावरुन अंदाज येऊ शकतो.. (फक्त भारताचीच अशी स्थिती आहे असे नाही)
कारण 'रागा'ला आमंत्रण देणारे Institute of International Studies Berkeley Research on Contemporary India Program and the Institute for South Asia Studies at the University of California (UC).. आणि
विषय- ‘India At 70: Reflections On The Path Forward’.. हा अभ्यासपूर्वक मांडणी करावयाचा विषय,यात राजकारण हा एकच विषय असु शकत नाही.अभ्यासपूर्ण चिकित्सेसह भविष्यात भारत जगाला कोणत्या गोष्टीत मार्गदर्शन करु शकतो याचे मत मांडणे आवश्यक असते. मोदी आणि त्यांचे राजकारण हीच एकमेव आज भारतातील समस्या अशी धारणा असलेला माणूस याविषयाव्यतिरिक्त काही बोलणे या बालबुद्धि कडून अपेक्षित ही नाही. या मातीतील अनेक नेत्यांनी, समाजसेवक आदीनी स्वातंत्र्यानंतर भरभरून दिलय, यावर बोलण्याकरता अनेक अभ्यासू आणि तशी कामे करणारे ही भारतात अनेक आहेत.

जीवन का महत्व तभी है जब वह किसी महान ध्येय के लिये समर्पित हो । यह समर्पण ज्ञान और न्याययुक्त हो ।
–इंदिरा गांधी

हे आजीचे वाक्य समजण्या इतकी ही त्याला *** नाही यात शंका नाही.आजकाल 'रागा'सारख्या अनेक विचारवंतांचा आणि भाटांचा सुळसुळाट आहे.पण खरा विचारवंत कोण हे समजण्या इतके आपण सर्व बुद्धिमान आहोत ही अपेक्षा आणि विश्वास ही..

पण 'रागा'चे ऐकून अमेरिका विकसीत स्थितीपासून आणखी किती अधोगामी/उर्ध्वगामी विकसीत होईल हे त्या संस्थेचे तज्ञच जाणो.

जाकी जैसी बुद्धि है , वैसी कहे बनाय ।
उसको बुरा न मानिये , बुद्धि कहाँ से लाय ॥
— रहीम

हे नक्की की, भाटां/पुरोगाम्यांकडून तेही आजी आणि पणजोबाप्रमाणे भारत भाग्यविधाते ठरवले जातील..

भारताचे प्रतिनिधी म्हणुन याच दिवशी म्हणजे 11 सप्टेम्बर 1893 ला "स्वामी विवेकानंदां"नी केलेले भाषण..दोघांच्या चारित्र्य आणि बुद्धिचीकुवत.. परिस्थिती यात जमीन आस्मानाचा फरक..दोघात कसलीच तुलना होवु शकत नाही.
(भाषणाच्या तारखेत असलेले साम्यपाहुन थोडी व्यथा झाली म्हणून लिहीण्याचा प्रपंच..)

विचारवंतांचे हे आजचेे प्रतिनिधीत्व पाहिल्यावर वाटते की, आजच्या तरुण पिढीला 'विवेका'ची अत्यंत गरज आहे. जन्म आणि मरण यामधील अंतर कापताना विवेकाचे वंगण वापरुन आनंदयात्री होणे हेच कदाचित मनुष्य जीवनाचे ध्येय असु शकते.आत्महत्येसारखी पळपुटे मार्ग स्विकारणारा आणि शुल्लक कारणाने निराश होणाऱ्या तरुणाला काय हवे याचा विचार कुणीही करताना दिसत नाहिये. शिक्षणाने आत्मविश्वास - आत्मसन्मान उभा राहायला हवा,पण प्रत्येकाला आज आरक्षणाची कुबडी हवीय. विज्ञानाची कास धरा  अशी परायणे करणारी जमात मानवी मनाचा विचार करताना दिसत नाही आणि बाबा-बुवा च्या नादी लागलेल्या भक्त (उच्चशिक्षितांची संख्या जास्त आहे)मंडळीच्या तोंडी लावायला ही विज्ञान कुठे दिसत नाही. शिक्षणव्यवस्थेकडे विवेक उभी करण्याची जबाबदारी होती,योग्य-अयोग्य यात फरक करता येण्यासाठी निरपेक्ष आणि निःष्पक्ष शिक्षकांची गरज होती आणि आहे, याकडे कुणाचे ही लक्ष नाही.माणुस विकला जातोय याची कुणालाच खंत नाहिये.कुठल्याही धर्मातील मठाधिपतींना काहीही करायचे नाहिये, कारण मुर्खांवरच त्यांची पोट भरत आहेत.सर्व बुद्धिवाद्यांनी आज पुनः शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे,कारण राजकारण हीच एकमेव भारतापुढील समस्या आहे, असा आभास उभा केला गेलाय.

परंतु ज्यांना विधायक कामे करायची आहेत, अशांसाठी बाबा आमटेंसारखी युगपुरुषे आवाहन देतायेत-

माझ्या युवकांनो !
या युगयात्रेत माझ्याबरोबर येण्याची मी तुमच्यावर सक्ती करीत आहे
युद्धातल्या भरतीसाठी नव्हे
तर या विराट अभावाच्या पूर्तीसाठी
आणि तुमच्या-माझ्या अस्तित्वांना अर्थ आणण्यासाठी
मी तेथे येण्याची तुमच्यावर सक्ती करत आहे

जेथे तुमच्या गरजा तुमच्याठायी जन्मण्यापूर्वीच जाणल्या जातील
जेथे तुमच्या अंतरंगात तुम्ही ताठ उभे राहाल
आणि स्वतःच्या आत ताठ उभे राहाल
अभेद्य सेना जेथे तयार होईल
आपल्या आत तुम्ही किती मोठे आहात
हे जेथे मी तुम्हाला दाखवू शकेन
तेथे तुमचे हात जुळतील
तुमची हृदये एक होतील
तुमच्या मस्तकांचे तेथे मिलन होईल
आणि स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालेल
अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासी होईल
तेथे ‘आज’ च्या भोवती विश्वासाचे  कुंपण असेल
आणि त्यामध्ये प्रिय कर्माची हिरवळ अमाप माजलेली असेल

"आत्मदीपो भवः" हा बुद्धांचा संदेश पुन्हा आत्मसात करायला हवा. सतत प्रश्न विचारणारा सॉक्रेटीस बुद्धित जन्मायला हवा.स्वतःची चुक मान्य करायला प्रामाणिक बुद्धी हवी."सदसद्विवेक", "नित्यानित्यवस्तुविवेक" जागृत करण्यासाठी बुद्धि प्रगल्भ असणे गरजेचे,म्हणून अशी प्रगल्भ बुद्धि बनवण्यासाठी वाचनाची/विचारांची आणि अनुभवाची जोड हवी.

हे दीपा तू जळत रहा ।

असाच जागत या विजनावर
जीवनसुम तिमिरास वहा ॥

नक्षत्रांशी होते नाते
परि न आता सांगायाचे

भग्‍न चिर्‍यावर वादळात या
तुला मला रे जळावयाचे
विसर मंदिरे विसर गोपुरे
श्रेय इथे मातीत पहा ॥
(कुसुमाग्रज)



- केदार मुत्तगी

2 comments:

  1. आपल्या शिक्षण घेण्यामागचा हेतूचा एकदा पुनर्विचार करायला हवा आणि reconstruct करायला हवा. Because purpose behind any action will tell our vision & aim clearly and that will guide us in future also. जोपर्यंत शिक्षण घेण्यामागे फक्त नोकरी मिळवणे हे एकच उद्दिष्ट असेल तोपर्यंत आपल्या बुद्धिमध्ये विवेकाचा भर पडणार नाही.

    ReplyDelete
  2. सुंदर लेख👍

    ReplyDelete